नमस्कार मंडळी !
मुंबई वरील अतिरेकी हल्ल्याचे सावट आता दूर झाले आहे। मुम्बैकर आपल्या दैनंदिन जीवनात पुन्हा एकदा मग्न झाला आहे।
ह्याचे कौतुक करायचे की हा एक दोष समजायचा ?
आम्हाला कोणतीही बातमी फक्त दोन दिवस पुरते मग आम्ही ती विसरून जातो।

आता वेळ आहे जागृत होण्याची । नविन धडा शिकण्याची ।
जर पुन्हा अशा घटना घडू नयेत असे वाटत असेल तर जागरुक रहाण्याची गरज आहे
पोलीस किंवा आर्मी रोज आपल्या मदतीला येवू शकणार नाहित। आता आपले रक्षण आपणच करण्याची आवश्यकता आहे।
मात्र याचा अर्थ असा नव्हे की आपण बंदुका हाती घेतल्या पाहिजेत । डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा आणि द्वेषजनक वक्तव्ये करण्याचे टाला।
जय हिंद !! जय महाराष्ट्र !!


This entry was posted on 1:03 AM and is filed under . You can follow any responses to this entry through the RSS 2.0 feed. You can leave a response, or trackback from your own site.

0 comments: